शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

मलेरियाचा मृत्यूदर घटला

By admin | Published: April 26, 2016 2:32 AM

पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात. २००९ मध्ये मुंबईत मलेरियाने थैमान घातले होते. मुंबईत मलेरियामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. पण २०१० ते २०१४ या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळाली. जागतिक मलेरिया दिनानिमित्त फॅमिली वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे (एफडब्लूटीआरसी) एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत डॉक्टर आणि या विषयातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. ‘चांगल्यासाठी मलेरियाचा नाश करा’ या संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुंडे यांनी मुंबईतील मलेरियाची सद्य:स्थिती मांडली. डॉ. फुंडे यांनी सांगितले, की मलेरिया हा डासांमुळे होतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका काम करीत आहे. २००९ मध्ये वाढलेल्या मलेरियांच्या रुग्णांमुळे पालिकेने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला होता. त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे. २०१० मध्ये मुंबईत मलेरियामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये हे प्रमाण ५ वर आले आहे. त्यामुळे मुंबईत मलेरिया नियंत्रणात आणण्यास महापालिकेला यश आले आहे. या परिषदेला ‘एफडब्लूटीआरसी’चे (मुंबई) संचालक डॉ. दीपक राऊत यांनी कोलकाता, उत्तर पूर्वेकडील राज्यातील मलेरियाविषयीचे अनुभव सांगितले. केईएम रुग्णालयाचे डॉ. आर. आर. शिंदे यांनी मलेरियाविषयी परिपूर्ण संकल्पना विशद केली. समाजाच्या गरजेप्रमाणे मलेरियाविषयी वेगळा विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ‘डास उत्पत्तीक्षेत्र शोधक’ ही संकल्पना राजन नारिंग्रेकर यांनी सांगितली. (प्रतिनिधी)