प्रवाशांची गैरसोय : वेटिंग रुम झाल्या फुल्लनागपूर : दिल्ली आणि इतर मार्गावर धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्या १८ तास विलंबाने धावत आहेत. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना रेल्वेगाड्यांची वाट पाहात ताटकळत बसण्याची पाळी आली असून रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुम फुल्ल झाल्याची स्थिती आहे.मागील आठ दिवसांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दाट धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असल्यामुळे धुके ओसरल्यानंतर रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान बुधवारी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात रेल्वेगाडी क्रमांक १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस १४.३० तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ११ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १८ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १६ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ४.४५ तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ६ तास, १६३६० पटना-एर्नाकुलम एक्स्प्रेस १३ तास, २२६९३ बेंगळुरू-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ४ तास, १२२९६ पटना-बेंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ६ तास आणि १२५७७ दरभंगा-म्हैसूर बागमती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
धुक्यामुळे रेल्वेगाड्यांना विलंब
By admin | Published: January 01, 2015 1:27 AM