शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

गृहमंत्र्यांना हटवा!

By admin | Published: June 25, 2014 1:16 AM

राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले

अहमदनगर :  राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले असून त्याला गृहमंत्री आर.आर. पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांना हटविण्याची मागणी खा. हुसेन दलवाई यांनी केली आहे.
आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत असून स्वत:च्या खात्यावर पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी तातडीने पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी दलवाई यांनी येथे केली. 
राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार असून राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. खर्डा, सोनई, आष्टी, पुणो आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस तपासकामी निष्क्रिय झाले आहेत. राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेशात शिक्षेचे प्रमाण अनुक्रमे 35 व 5क् टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आरशात पाहावा
शिर्डीच्या साईबाबांना सर्व समाज मानतो. त्यांचे जीवन विनयशील, सेवाभावी होते. सेवाभाव वृत्तीमुळेच त्यांनी संतत्व मिळविले. साईबाबांविषयी लोकभावना भडकाविणारे शंकराचार्याचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आधी आरशात पाहावा. वादग्रस्त वक्तव्याने त्यांचा समाजातील आदर कमी झाला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना आकाश ठेंगणो झाले आहे, असे दलवाई म्हणाले.
 
अत्याचाराच्या घटनेनंतर उज्‍जवल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजीचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ्याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही, असे दलवाई म्हणाले.