शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युला मुंबईत नाही : मुख्यमंत्री

By admin | Published: January 13, 2016 4:24 AM

वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असल्याने दिल्लीत वाहनांसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला राबवण्यात आला. मात्र या फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असल्याने दिल्लीत वाहनांसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला राबवण्यात आला. मात्र या फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुंबईतील एनसीपीए येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, पोलीस आयुक्त अहमद जावेद, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) गौतम चॅटर्जी, वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत वाहनांची संख्या कमी आहे. मुंबईत जवळपास २५ लाख वाहने धावतात. दिल्लीत यापेक्षा तिप्पट वाहने धावतात. वाहनांची संख्या आणि सध्या उपलब्ध असलेली पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था पाहता सम-विषम फॉर्म्युला मुंबईसाठी आवश्यक नाही. मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्टसारखी व्यवस्था अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नही केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत वाहनांसाठी फॉर्म्युला लागू केल्यानंतर सध्या नवीनच उद्योग सुरू झाल्याचे सांगत सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सम-विषम नंबरच्या प्लेट वाहनांसाठी वापरल्या जात असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दंडाची रक्कम वाढणारनियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सध्या दंड ठोठावला जातो. हा दंड फार कमी असून त्यात वाढ होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत केंद्र सरकारकडे विधेयक असून ते लवकरच मंजूर होईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि दंडही चांगला मिळू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आॅक्टोबरपर्यंत सीसीटीव्ही बसणाररस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियमांच्या पालनाचा विचार पुढे नेला पाहिजे. नियमांचे बंधन वाहनचालकांना घातल्यास अपघात होणार नाहीत, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी सांगितले. ९५0 कोटी रुपये खर्च करून मुंबईत आॅक्टोबरपर्यंत ६,२00 सीसीटीव्ही बसविणार असल्याचेही ते म्हणाले.