शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Published: December 23, 2015 1:22 AM

राज्य शासनातील पाच मंत्र्यांच्या विभागांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असून, यासंदर्भात न्यायालयीन चौकशी लावण्यात यावी

नागपूर : राज्य शासनातील पाच मंत्र्यांच्या विभागांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असून, यासंदर्भात न्यायालयीन चौकशी लावण्यात यावी. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या मंत्र्यांनी पदत्याग करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नियम २६० अन्वये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढविला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या मंत्र्यांच्या कारभारावर मुंडे यांनी टीका केली.डाळींच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध का उठवले गेले? साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला दिले होते. पण कोणत्याही साठेबाजावर कारवाई करण्यात आली नाही. राज्यात डाळींच्या साठेबाजीमुळे चार ते साडेचार हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे शालेय शिक्षण विभागात तर महापुरुषांच्या छायाचित्रांचादेखील आर्थिक घोटाळा झाला आहे. राज्याच्या उद्योग विभागाने यासंदर्भात शासकीय कार्यालयांना सावध करूनही शिक्षण विभागाने ही छायाचित्रे व पुस्तक खरेदी जाणूनबुजून केली आहे. ७ व १२ रुपयांची छायाचित्रे १ हजार ३९५ रुपयांना घेण्यात आली, असा आरोप मुंडे यांनी केला. राज्यात शेतकरी संकटात सापडला असताना ऊर्जाखात्याने सौरऊर्जा पंपांची योजना आणली. परंतु यातदेखील महागड्या दराने खरेदी झाली. यात भ्रष्टाचार झाला असून यासंदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मुंडे यांनी मागणी केली. राज्य शेती महामंडळाची जमीन संयुक्त शेती अंतर्गत करारपद्धतीने देण्याच्या टेंडर प्रक्रियेतदेखील भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली.आमचा ‘सीबीआय’च्या चौकशीवर विश्वास नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणांची ‘कमिश्नर आॅफ इन्क्वायरीज् अ‍ॅक्ट’ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उचलून धरली.