शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शहरातील टँकरच्या मागणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2017 12:39 AM

शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली

पुणे : शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात न उतरता कागदावरच राहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा मोठ्या सोसायट्या तसेच वस्ती भागाला अपुरा पडू लागला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शहरातील पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुंबईमध्ये कालवा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत शहराला दररोज १३५० एमएलडी पाणी देऊन दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १३५० एमएलडीइतक्या पाण्यामध्ये संपूर्ण शहराला दोन वेळा पाणी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून त्याच वेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. केवळ पेठांचा काही भाग वगळता इतरत्र एक वेळच पाणी दिले जात आहे. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. सोसायट्यांबरोबरच मोठे हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, हॉस्टेल यांच्याकडून टँकरची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या जलकेंद्रातून पाणी उचलणाऱ्या टँकरचालकांनी सोसायट्या व वस्ती भागाला प्राधान्याने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात या व्यावसायिक कारणासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. वडगावशेरी, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, बावधन, बाणेर, पाषाण आदी भागांमधील सोसायट्या व वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर रस्ता, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी आदी भागाला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत आहे. मार्च २०१७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांचे पुनर्वसन या प्रश्नावरून भामा आसखेड पाइपलाइनचे काम रखडले आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी या भागातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.चार जलकेंद्रांवर टँकर भरणामहापालिकेच्या पर्वती, चतु:शृंगी, वडगावशेरी, रामटेकडी, पद्मावती आदी भागाला ४ जलकेंद्रांवरून टँकरचालकांना पाणी उपलबध करून दिले. महापालिकेकडून एका टँकरच्या पाण्यासाठी ४५० रुपये शुल्क आकारले जाते. टँकरचालकांकडून १२०० ते १४०० रुपयांमध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. महापालिकेव्यतिरिक्त २०० खासगी बोअर, विहीरमालकांकडून टँकरसाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यांच्याकडून १२५ ते १५० रुपये एका टँकरमागे घेतले जातात.उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. टॅँकर चालकांनी मनमानी पद्धतीने पाण्याची विक्री सुरू केली असल्याच्या तक्रारी आहेत.>मोठ्या हॉटेलकडून सर्वाधिक मागणीशहरातील फाइव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलना नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळा सुरू होताच त्यांच्याकडून पाण्याच्या टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर मॉल्स, हॉस्टेल, आयटी कंपन्या यांनाही टँक रची आवश्यकता भासत आहे.