शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कर्जमाफीची मागणी करीत सेनेचा सरकारवर हल्लाबोल

By admin | Published: July 16, 2015 2:12 AM

संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई : संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला. गेले दोन दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे अनेकदा कामकाज बंद पाडलेले असताना आता शिवसेनेदेखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, सुभाष साबणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपाचे अनिल गोटे यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीसाठी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना आता त्यांच्या भूमिकेला आज एकप्रकारे पाठिंबा देत शिवसेनेने सरकारची कोंडी केली आहे. गुुलाबराव म्हणाले, राणा भीमदेवी थाटात शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करीत आपण सत्तेवर आलो. शेतकऱ्यांनी निवडून दिले म्हणूनच युतीचे सरकार आले, याचा विसर पडू देऊ नका. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांनी पदरमोड करु न शेतात टाकलेले बियाणे वाया गेले आहे. शेतकरी आज सरकारकडे डोळे लावून बसला असून त्या शेतकऱ्यांना सरकार मदत देणार की नाही.