शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

देशात लोकशाही जगली पाहिजे, लोकांची डोकी काय फोडताय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 2:10 PM

लोकांवर जोरजबरदस्ती करण्याची गरज काय? चांगले प्रकल्प आणा, आम्ही विकासाच्या आड येत नाही असंही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले. 

मुंबई - न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या अंमलाखाली घेण्याची तयारी झालीय. न्यायमूर्ती कोण हेच ठरवणार. इस्त्राईलमध्येही तेच झाले. लाखो लोक रस्त्यावर उतरले. पंतप्रधान बाहेर पडू शकत नव्हते इतका जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. भारत देशात लोकशाही जगली पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे त्यासाठी रस्त्यावर उतरायलं हवं. लोकांच्या हिताची गोष्ट असेल तर ती डोकी फोडून का सांगताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला विचारला आहे.  

...मग डोकी काय फोडताय? रिफायनरीसाठी बारसूतील जागा होय मी सुचवली पण अडीच वर्ष पोलीस यंत्रणेचा वापर करून तिथल्या लोकांवर अन्याय केला नाही. माझ्या निर्णयावर इतके प्रेम होते मग आरेच्या जागेचा निर्णय का बदलला? बुलेट ट्रेन कोणासाठी करताय? राज्याच्या मूळावर येणारे विषय मी अडवले होते आणि यापुढेही अडवेन. बारसू, नाणारबद्दल मी भूमिका मांडली ती तिथल्या स्थानिक लोकांची होती. पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प नको. रिफायनरी प्रकल्पाचं राज्यात कुठे स्वागत होत असेल तर तिथे जरूर लावा. बारसूची जागेचा प्राथमिक अहवाल आला. ती जागा मोकळी आहे. तेव्हा मी ती जागा सुचवली. लोकांच्या हिताची गोष्ट आहे मग ती डोकी फोडून का सांगताय? लोकांवर जोरजबरदस्ती करण्याची गरज काय? चांगले प्रकल्प आणा, आम्ही विकासाच्या आड येत नाही असंही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले. 

लोकांच्या मनातील संशय दूर करा एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? चांगले प्रकल्प असतील ते इतर राज्यात पाठवले. रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत. कोकणात आम्ही पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला मग त्यात पुढे का काही करत नाही? राज्यात उद्योगधंदे आहेत म्हणून राज्य वर आलंय. कष्टकरी, कामगार राज्यात आहेत. प्रकल्प लोकांना दाखवा, लोकांच्या मनातील संशय दूर करा. रोजगार उपलब्ध होणार असेल तर तो कायमस्वरुपी मिळणार आहे की नाही ते सांगा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दलालांना पैसे मिळणार, सरकार दडपशाही करणारएखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जमीन भूसंपादित करायची असते. तेव्हा मूळ मालक असतो त्याला किंमत द्यावी लागते. रिफायनरी आणखी कुठे लागलीय तिथे लोकांना न्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं असेल तर ते दाखवा. लोकांना चिरडून, कुणाच्यातरी सुपारी घेऊन प्रकल्प लादतायेत. मूळ मालक वेगळेच झालेत. दलालांनी जागा विकत घेतल्या. त्या लोकांना नुकसान भरपाई मिळणार. सरकार दडपशाही करणार असा आरोप ठाकरेंनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा