शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

डेंग्यूचे थैमान; प्रशासन मात्र सुस्तच

By admin | Published: November 09, 2014 12:48 AM

शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती.

महापालिका : ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले ?नागपूर : शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती. परंतु प्रशासन अद्याप सुस्तच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची गर्दी वाढल्याने अनेक खासगी रुग्णालयांनी वसुलीला सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेचा हा खर्च आहे. क्षमता नसतानाही जीवाला धोका नको म्हणून नाईलाजाने रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे डेग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचा दावा मनपातील पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरातील अनेक वस्त्यात अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले, असा प्रश्न लोकांना पडला आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अशा वस्त्यांत फेरफटका मारला तर वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास येईल. नागरिकांची अशी संतप्त प्रतिक्रिया आहे. डास नियंत्रणासाठी औषध फवारणी सुरू असल्याचा दावा केला जात आहेत. परंतु प्रत्यक्षात अनेक वस्त्यात मागील काही महिन्यात औषध फवारणी करणारे फिरकलेले नाही. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कागदोपत्री आकडेवारी गोळा करून अहवाल तयार केला जातो. अशी धक्कादायक माहिती आहे. ज्या वस्त्यात आरोग्य विभागाचे पथक फिरकले नाही. (प्रतिनिधी)