शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

शेतकरी कर्जमाफीस केंद्राचा नकार

By admin | Published: March 24, 2017 2:30 AM

शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफी देण्यास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट नकार दिला.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफी देण्यास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट नकार दिला. मात्र राज्यांना कर्जमाफी द्यायची असेल तर त्यांनी ती स्वत:ची ऐपत पाहून द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.कर्जमाफीसाठी एखाद्या राज्याला मदत करायची व इतरांना करायची नाही, अशी भूमिका केंद्र सरकार घेणार नाही व केंद्राकडून यासाठी मदत न करण्याचे धोरण सर्वच राज्यांसाठी एकसमान असेल, असेही ते म्हणाले. सरकारने केवळ उत्तर प्रदेशात कर्जमाफी न देता आधीच्या संपुआ सरकारने सन २००६ मध्ये दिली तशी देशभरातील सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे धोरण ठरवावे, अशी मागणी काँग्रेस सातत्याने करत असून पक्षाच्या खासदारांनी यावरून संसदेतून सभात्यागही केला होता. या अनुषंगाने जेटली राज्यसभेत म्हणाले की, एखाद्या राज्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीशी वाटत असेल तर त्यासाठी त्या राज्याने स्वत:कडे निधी आहे की नाही ते पाहावे व त्यानुसार निर्णय घ्यावा. केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग म्हणाले की, भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तेथील सरकारच शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)