शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कुंभामुळे गोदाप्रदूषणात वाढ

By admin | Published: October 30, 2015 1:20 AM

सिंहस्थ कुंंभमेळाव्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे

मुंबई : सिंहस्थ कुंंभमेळाव्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राला (निरी) दिले. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध प्रा. एच. एम. देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबत न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याच अनुषंगाने गोदावरीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत दाखल अन्य एका याचिकेचा संदर्भ देत राज्य सरकार व नाशिक महापालिकेने ते रोखण्यासाठी योग्य कार्यवाही न केल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरी नदी घाण झाल्याने ती स्वच्छ करण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. मात्र, या पत्रावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. यावेळी खंडपीठाने नमूद केले की, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिकेला वारंवार आदेश देऊन ‘निरी’च्या मदतीने गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुंंभमेळ्यामुळे पुन्हा पाणी घाण झाले आहे, त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने नदीची पाहणी करून उपाययोजना आखण्याचे निर्देश न्यायालयाने निरीला दिले. त्याचबरोबर यापुढे नदीच्या प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची सूचनाही न्यायालयाने केली. यावर पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)