शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

लहानग्यांमध्येही वाढतेय उदासीनता

By admin | Published: April 07, 2017 1:57 AM

मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही

मुंबई : ‘मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही म्हणून चिडचिड करणे’, ‘फोटोला लाइक्स केले नाही कुणीच’, ‘बेस्ट फ्रेंडशी भाडण झाले म्हणून जेवतच नाही’ अशा छोट्या-छोट्या टप्प्यांतून भविष्यात लहानग्यांच्या वाट्याला नैराश्य-उदासीनता येते, असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने एका सर्वेक्षणांती नोंदविले आहे.लहानग्यांमधील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भीती इ. लक्षणे दिसून येतात. लहान मुलेही अनेक वेळा निराश झालेली असतात, मात्र याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. यामुळे मुलांना अनेक मानसिक आजारांशी सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची उदासीनता लवकरात लवकर ओळखून त्यावर योग्य उपाय करावा, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संस्थेने यंदाचे वर्ष नैराश्याबद्दल जनजागृतीसाठी जाहीर केले आहे. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातो. उदासीनता ही अशी एक मानसिक अवस्था आहे, जी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र यानंतर ती गंभीर रूपही धारण करू शकते. कोणतीही गोष्ट करायला कंटाळा करते. सतत नकारात्मक विचार मनात डोकावत राहतात. नेहमीचे आयुष्य कोलमडून जाते अशा अवस्थेत मुले असली तर ती दुसऱ्यांचे अधिक नुकसान करू शकतात. त्यातूनच मग ती आत्महत्येचा पर्याय निवडतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी सांगितले. साधारणत: महिन्याभरात उदासीनता असलेल्या १० ते २० टक्के लहानग्यांवर उपचार सुरू करावे लागतात, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती सांगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)काय कराल?मुलांकडून अवास्तव अपेक्षा न बाळगता त्यांची क्षमता समजून घ्यावी. प्रत्येक वेळी ओरडून किंवा मारून सांगण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे, प्रत्येक वेळी ते काय सांगताहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे.सतत त्यांना उपदेश करू नका किंवा प्रत्येक वेळी सल्ला देऊ नका. त्यांचा आत्मविश्वास सतत जागरूक ठेवा.कधीही आपल्या मुलाची इतर मुलांच्या बरोबर तुलना करू नका.उदासीनतेमागची कारणेआजकालची मुले अधिक प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. या तंत्रज्ञानावरच ती बऱ्याचदा अवलंबून असतात. कारण या सोशल नेटवर्किंग साइटवरून सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. सतत एकमेकांशी चढाओढ झाल्यामुळे आपण कुठे तरी कमी पडतो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि मुलांमध्ये आपोआपच डिप्रेशन येते. मुले मानसिक आजाराला बळी पडण्याचे मोठे कारण म्हणजे मुलं जेव्हा पालकांना काही तरी सांगत असतात, तेव्हा पालक त्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. त्यांच्या शाळेत काय घडते हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. कधी कधी पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करतात, म्हणजे आपली पूर्ण न झालेली स्वप्ने ते मुलांमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या दडपणाखाली मुले सतत आल्याने ती डिप्रेशनमध्ये जातात.आजकाल आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे त्यांचे कित्येक तास घराबाहेरच जातात. त्यामुळे मुलांना आई-वडिलांसोबत वेळ मिळत नाही.