शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

शेतकरी हिताचे धोरण राबवा

By admin | Published: October 30, 2015 1:05 AM

राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या हिताचे धोरण आखण्याची सूचना राज्य सरकारला केली

मुंबई : राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या हिताचे धोरण आखण्याची सूचना राज्य सरकारला केली. त्याचप्रमाणे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुुटुंबीयांची परिस्थिती काय आहे, अशी विचारणा करीत, त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्याची सूचना न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने केली.यावर्षी मराठवाड्यात ६०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने, उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत, ‘सू-मोटो’ दाखल करून घेतले. ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्ती केली. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅड. कुंभकोणी यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यात १५,९७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सादर केली आहे. ‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन-चार एकर जमीन आहे. मात्र, या अल्पभूधारकांना काहीच उत्पन्न मिळत नसल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे समाजाला तोंड कसे दाखवायचे, या भीतीने ते आत्महत्या करत आहेत. ज्यांच्या मालकीची शेती नाही आणि जे शेतमजूर आहेत, अशी लोक आत्महत्या करत नाहीत. केवळ समाजाच्या भीतीने काही शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा अनेक बाबी संशोधनातून पुढे आल्या आहेत,’ असे त्यांनी माहितीत नमूद केले आहे. त्यावर खंडपीठाने एकत्रित शेती पद्धत राबवण्याची सूचना राज्य सरकारला केली. एकत्रित शेती पद्धत करण्यासाठी एपीएमसी कायद्यात सुधारणा करावी लागली तर करा, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)