शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

मुंबई विद्यापीठाला विकास ‘लकवा’

By admin | Published: April 13, 2015 5:36 AM

मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला नसल्याने विद्यापीठाला विकास लकवा झाला आहे की काय, अशी टीका विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होत आहे.विद्यापीठाने २0१३-१४ या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी कित्येक कोटींची तरतूद केली होती. मात्र, तरतूद केलेला निधीतील एक रुपयाही आजवर वापरण्यात आला नसल्याने विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे उपकेंद्रासाठी ४ कोटींची तरतूद झाली. मात्र, त्यामधील निधी पूर्ण वापरलेला नाही. विद्यानगरीतील विविध बांधकामांसाठी २८ कोटी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यामधील १0 कोटींचा खर्च झाला आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रेसमधील मशनरीसाठी २0 लाखांची मात्र त्यामधील एकही रुपया खर्च झाला नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा कारभार कुर्मगतीने सुरु असल्याचे दिसत आहे.कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीचे कामही ठप्प झाले आहे. प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल न दिल्याने त्याने सुरक्षा भिंतीचे काम थांबवले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका विद्यापीठाच्या विकासाला बसत आहे. विद्यापीठ अर्थसंकल्पात तरतूद करते. परंतु तो निधी वापरात येत नसल्याने विद्यापीठाचे नुकसान होत असल्याचे, सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)