शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

आपत्तीवरील खर्चाने विकास मंदावला

By admin | Published: August 11, 2014 3:38 AM

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला

शिर्डी : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला असला, तरी उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरच असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य पणन मंडळामार्फत खडकेवाके येथे उभारलेल्या राज्यातील पहिल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले़ गेल्या तीन चार वर्षांत राज्य सरकारने आपत्ती निवारणासाठी दहा-बारा हजार कोटी रुपये खर्च केले़ गारपिटीत शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली. विशेष म्हणजे यातील ९० टक्के रक्कम महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली़़ नैसर्गिक आपत्तीत एवढ्या तातडीने देशात कोणतेही राज्य मदत करु शकलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उन्हाळ्यात जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टँकर यावरही कोट्यवधी रुपये खर्च झाल्याने विकास योजनांना कात्री लावावी लागली. पावसाच्या अनियमिततेवर उपाययोजना म्हणून मोठ्या प्रकल्पांबरोबरच भूजल पातळी वाढण्याकरिता गावोगावी शेततळी, ओढ्यांवर साखळी बंधारे बांधावे लागतील़, असे चव्हाण म्हणाले. राज्यातील वस्त्रोद्योगात चाळीस हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहा लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी व पणन विभाग एकत्र करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसत आहेत. अ‍ॅग्रोपार्कच्या माध्यमातून विकासाचे नवे दालन खुले झाल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)