शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 8:50 PM

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुंबई: वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रात येणार होता, पण ऐनवेळी तो गुजरातला हलवण्यात आला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपले मत मांडले, तसेच रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेवर टीकाही केली.

5 लाख लोकांना रोजगार मिळाला असतादेवेंद्र फडणवीस म्हणाले की, '3 लाख 50 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. सर्व शासकीय ऑईल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट मोठी रिफायनरी राज्यात आली असती.'

शिवसेनेमुळे मोठा प्रकल्प गेला'ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. या रिफायनरीमुळे महाराष्ट्र खूप पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला शिवसेनेने विरोध केला, ती राज्यात होऊ दिली नाही. आम्ही त्यावर विचार कर आहोत, पण आता ती स्केल डाऊन झाली आहे. ती आता साडे तीन लाख कोटीची राहिली नाही. राज्यात होणारी एवढी मोठी गुंतवणूक सेनेने घालवली,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

येत्या काळात नवीन प्रोजेक्ट आणू'गुजरात भारतातील राज्य आहे, हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होते. पण, सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती, त्यामुळे अधिकचा आग्रह करता आला नाही.  पण, आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार,' असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना