शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषयच संपवला! पवार-ठाकरेंना चांगलंच सुनावलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:56 IST

राज्यपालांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या मुद्द्यावर आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. सकाळी उदयनराजे छत्रपतींनी आपले मत मांडले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. तर संध्याकाळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला आणि पवार-ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर सडेतोड भाष्य केले.

उदयनराजे छत्रपती यांनी भूमिका मांडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली, असा एका वाक्यात फडणवीसांनी विषय संपवला. "राज्यपालांच्या विधानाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. उदयनराजे महाराज यांनी जाणीव करून दिली, तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलले. सर्वात आधी उदयनराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. आणि शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. या साऱ्या गोष्टींना राजकीय रंग कसा देता येईल असा प्रयत्न सुरू आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत. भारताचा ते आदर्श आहेत. यावर वाद किंवा दुमत असूनच शकत नाही. पण आज जे लोक खडबडून जागे झाले त्याचे कारण उदयनराजे यांनी लिहिलेले पत्र आहे. त्यांनी पत्र लिहिले आणि पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शरद पवार यांनी पत्रकारांशी या विषयावर संवाद साधला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणून उद्धव ठाकरे या विषयावर बोलले," असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले