शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

भक्तांपुढे सूर्याचा दाहही फिका!

By admin | Published: April 17, 2016 1:46 AM

‘पंढरपुरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस ओलांडून जात असतांनाही चैत्री वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांनी आठ तास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले

- दीपक होमकर,  पंढरपूर‘पंढरपुरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस ओलांडून जात असतांनाही चैत्री वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांनी आठ तास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले आणि सूर्यनारायणाच्या दाहच्या तीव्रतेपेक्षा निस्सीम भक्ती अधिक खोल असल्याचे दाखवून दिले. शुक्रवारी ४३़७ तर शनिवारी ४३़२ अंश सेल्सियस असे तापमान वैष्णवांना विठ्ठल दर्शनापासून रोखू शकले नाही़चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरच्या यात्रेला अधिक महत्त्व असते़ त्यामुळे त्या यात्रेला जाता-जाता पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिंड्या व कावड्या पंढरपूर मार्गे जातात़ त्यामुळे या चैत्रीवारीला धावती वारी असेही म्हणतात. दुष्काळाचा दाह आणि विक्रमाकडे वाटचाल करणारे तापमान यामुळे यंदाची वारी दरवर्षीपेक्षा निम्मीच होईल, असा अंदाज पंढरपूरकरांचा होता; मात्र विठ्ठलावर जीवापाड भक्ती करणाऱ्या वारकरी भक्तांनी हा अंदाज फोल ठरवला. या धावत्या वारीच्या निमित्तानेही पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले. पहाटेपासूनच अनेक दिंड्या आणि कावडी पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली. सकाळी नऊनंतर उन्हाची तीव्रता कमालीची वाढत असल्याने नऊच्या आत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी पहाटेपासूनच चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शनबारीत उभे राहिले़ त्यामुळे पहाटे दर्शन सुरु होण्याआधीच दर्शनबारी वीणेगल्लीपर्यंत पोहोचली होती तर सकाळी नऊ वाजता ती सारडा भवनच्या पुढे होती. नऊनंतर मात्र दर्शनबारी वाढली नाही, ती ओसरत वीणेगल्लीपर्यंत आली़ त्यानंतर सायंकाळी ऊन उतरल्यावर पुन्हा गर्दी वाढली आणि दर्शनबारी पुन्हा वाढली आणि ती रांग पत्राशेडच्या जवळपास पोहोचली होती. त्यामुळे दर्शनासाठी सुमारे सात ते आठ तासांचा वेळ लागत होता़ (प्रतिनिधी)व्हीआयपी दर्शन; कडेकोट बंदव्हीआयपी आणि आॅनलाईन दर्शन पास दशमी, एकादशी व द्वादशी या तीन दिवसांत बंद ठेवण्यात आले होते. शिवाय बारीत होणारी घुसखोरीही कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे जवळपास बंद होती़ त्यामुळे भाविकांना सात ते आठ तासांत दर्शन होणे सुकर झाले अन्यथा व्हीआयपी पास सुरु असल्यास दर्शनाला दहा तासांहून अधिक वेळ लागतो.राज्यात सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे यंदाची वारी दरवर्षीपेक्षा निम्मीच होईल, असा अंदाज पंढरपूरकरांचा होता; मात्र विठ्ठलावर जीवापाड भक्ती करणाऱ्या वारकरी भक्तांनी हा अंदाज फोल ठरवला.