शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

तुम्हाला माहितीये का....रणबीर आणि आलिया एकत्र करणार होते पदार्पण

By admin | Published: April 11, 2017 10:56 PM

सावरिया चित्रपटातून पदार्पण करणा-या रणबीरने आपण आलिया भटसोबत पदार्पण करणार होतो असा खुलासा केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - सावरिया चित्रपटातून पदार्पण करणा-या रणबीरने खरंतर आपण आलिया भटसोबत पदार्पण करणार होतो असा खुलासा केला आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलाखत घेण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच आलिया आणि रणबीर कपूर यांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेत दोघांना बोलते केले. मुलाखत घेण्याआधी दोघांनाही आऊटस्टॅडिंग एंटरटेनर पुरस्कारने गौरवण्यात आलं. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. 
 
रणबीर कपूरला जेव्हा आलियाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा आपण आलियासोबत पदार्पण करणार होतो असा खुलासा केला आहे. "संजय लिला भन्साळी आलिया वधू नावाचा चित्रपट करणार होते. ज्यासाठी मी आणि आलियाने एकत्र फोटोशूटदेखील केलं होतं. तेव्हापासून मी आलियाचा चाहता आहे", असं रणबीरने सांगितलं आहे. यावर बोलताना आलियानेही आठवणी शेअर करत "मी जेव्हा रणबीरला भेटली तेव्हा फक्त 11 वर्षांची होती. तेव्हा रणबीर कपूर संजय लिला भन्साळी यांना असिस्ट करत होता. तेव्हा मला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायचं होतं. पण मी खूप लाजरी होती. पण सावरिया पाहिल्यापासून मी त्याची चाहती आहे", असं आलियाने सांगितलं. 
 
रणबीरनेही आलियाचं कौतुक करताना आलियाचा "हायवे" चित्रपट आपल्याला प्रचंड आवडला असल्याचं सांगितलं. तो चित्रपट पाहिल्यानंतर आलिया म्हणजे अमिताभ बच्चन असल्याचं मी मित्राला सांगितलं होतं", असंही रणबीरने सांगितलं. रणबीरचा कोणता चित्रपट आवडला असं विचारलं असता ‘बर्फी’ आणि "रॉकस्टर"चं नाव आलियाने घेतलं. तसंच संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील त्याचं काम सर्वोत्तम असेल असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला. 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
lmoty.lokmat.com