शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची वाट अवघडच

By admin | Published: June 27, 2017 2:26 AM

विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर आता रोज नवीन आव्हाने उभी राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर आता रोज नवीन आव्हाने उभी राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आता विधिच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ४५ टक्क्यांची मर्यादा असतानाही ४९ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाइन स्वीकारले जात नाहीत. गुणांची मर्यादा वाढल्यास शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे टीवायचे निकाल लागण्याची चिन्ह नसल्याने हजारो विद्यार्थी तणावाखाली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने सीईटी सेलने यावर तातडीने कार्यवाही करून सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. विधि अभ्यासक्रमांसाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरता येणार नाहीत. एलएलबीच्या अभ्यासक्रम माहितीपुस्तिकेत ४५ टक्क्यांची मर्यादा देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अर्ज भरताना ४७ अथवा ४८ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ जूनला सुरू झाली. ४९ टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत ४९.५० टक्क्यांहून कमी गुण असल्यामुळे तुमचा अर्ज स्वीकारला जात नसल्याचा मेसेज येत आहे. याबाबत युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सीईटी सेल आयुक्त चंद्रशेखर ओक यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.