शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

‘डिजीटल इंडिया’ तडीपार!

By admin | Published: March 10, 2016 1:49 AM

पंतप्रधांनानी डिजीटील इंडियाची घोषणा केलेली असली तरी, येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मागासवर्गिय कल्याण योजनेतून देण्यात येणारे संगणक शिक्षण बंद करण्यात आले आहे

हुसेन मेमन,  जव्हारपंतप्रधांनानी डिजीटील इंडियाची घोषणा केलेली असली तरी, येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मागासवर्गिय कल्याण योजनेतून देण्यात येणारे संगणक शिक्षण बंद करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातंर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत होते. राज्यात काही ठिकाणी या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, राज्यशासनाने सरसकट सर्व योजनाच गुंडाळ्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.२२ फे्रबुवारी २०१६ पासून ही योजना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, पालघर यांच्याकडून आला. यामुळे सुरू असलेले नियमित अभ्यासक्रम अंतिम परीक्षेच्या काळातच बंद करण्यात आले. या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ व १६ जानेवारी २०१६ रोजी नागपुर येथे सर्व अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांची आढावा बैठक झाली होती. यामध्ये नागपूर, तळोदा अशा काही ठिकाणी संगणक प्रशिणाबाबत प्रशिक्षण न देताच बिले काढण्यात आलेली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही योजना तात्पुरती बंद करण्यात यावी असे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासकिय आश्रमशाळांना गेल्या काही वर्षापासून माहिती आणि तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण देण्याकरीता मोहोरबंद निविदा व ई-निविदा मागवून संस्थामार्फत आश्रमशाळांत १० ते १५ संगणक संच, प्रिंटर, र्इंटरनेट सुविधा, इनव्हर्टरच्या सुविधेसह प्रशिक्षण दिले जात होते. शासन निर्णयानुसार एका संस्थेला चांगले प्रशिक्षण देत असल्याचा दाखला संबंधित शाळेकडून प्राप्त झाल्यास प्रशिक्षणाचा करार पुढील तीन वर्षापर्यत वाढविण्यात येत असे. या अनुशंगाने त्या त्या संस्थांनी आश्रमशाळांवर लाखो रूपये खर्च करून सुविधा पुरविल्यात आहेत. शासनाच्या या आडमुठ्ठेपणामुळे या व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमाराची वेळ आली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. > संस्थाचालक हवालदिल, पालक संतप्त...काही ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील योजना बंद करावी असा कुठला नविन नियम शासनाने काढला आहे, असा संतप्त प्रश्न पालक वर्गाने आणि संस्था चालकांनी केला आहे. तक्रारी जर दोन ते तीन ठिकाणी झाल्या आहेत तर त्या ठिकाणाच्या शाळांचे प्रशिक्षण बंद करावे, ज्या ठिकाणी एकही तक्रार नाही त्या ठिकाणचे प्रशिक्षण का बंद करावे ? प्रत्येक योजनेत आणि प्रकल्पात कुठेना कुठे काही न काही तक्रारी येत असतात, म्हणून मग त्याही योजना सर्वत्र बंद करणार काय? असा प्रश्न संस्था चालक व पालकांनी उपस्थित केला आहे. >मुख्यमंत्र्याकडे दाद मागणार...जव्हार प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या ३० आश्रमशाळांकरीता चार ते पाच संस्था मिळून प्रशिक्षण देत असून याबाबत आजतागायत कुठलीही तक्रार आलेली नाही. इतर प्रकल्पापेक्षा जव्हारमध्ये सहा. प्रकल्प अधिकारी गुजर यांनी प्रत्येक दिवसांच्या प्रशिक्षणाचे टाचण देण्याची अट नसतांना ती पाळणे बंधनकारक केल्यामुळे तेथे १०० टक्के प्रशिक्षण दिले जाते, परंतु तरीही आमच्यावर अन्याय का? असा संतप्त प्रश्न अभिनव व्होकशनल एज्युकेशनचे संचालक आसीफ मुजावर यांनी केला आहे, आम्ही याबाबत मुख्यंमंत्र्याकडे दाद मागणार आहोत असे त्यांनी सांगितले.