शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सर्वाधिकार पोलीस महासंचालकांकडे

By admin | Published: July 12, 2017 5:21 AM

आपत्तीच्या निवारणास स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) नियोजनाची जबाबदारी ठरविण्यात अखेर १४ महिन्यांनंतर ‘मुहूर्त’ मिळाला

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात उद्भविणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या निवारणास स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) नियोजनाची जबाबदारी ठरविण्यात अखेर १४ महिन्यांनंतर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख असलेल्या पोलीस महासंचालकांकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे केवळ कागदावर अस्तित्वात असलेले दल आता लवकरच कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. या फोर्सच्या रचनेपासून ते जवानांच्या नियुक्ती आणि प्रशिक्षणाबाबतचा निर्णय डीजींकडून घेतला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केंद्राच्या धर्तीवर स्थापन केलेल्या ‘एसडीआरएफ’ची उपराजधानी नागपूर व मराठवाड्यातील धुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक तुकडी कार्यरत राहणार आहे. त्यासाठी सध्या राज्य राखीव दलातून (एसआरपीएफ) २८८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दलाच्या नियोजनाची धुरा कोणाकडे सोपवायची, याबाबत निश्चिती न झाल्याने प्रस्तावाची अंमलबजावणी वर्षाहून अधिक काळ प्रलंबित राहिलेली होती. महापूर, दुष्काळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीबाबत योग्य खबरदारी न घेतल्याने निष्पाप नागरिकांचे बळी जातात, त्याचबरोबर वित्त व स्थावर मालमत्तेची मोठी हानी होते. त्याचप्रमाणे काही समाजकंटक व अतिरेकी संघटनांकडून होणाऱ्या घातपाती कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठीची यंत्रणा सक्षम असावी, यासाठी राज्य सरकारने पहिल्यांदा ३० आॅगस्ट २०१४ रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्यातही आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या प्रस्तावाला गेल्या वर्षी मे महिन्यात मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर नागपूर व धुळे येथील दोन तुकड्यांसाठी पहिल्यांदा राज्य राखीव दलातील २८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करून त्यांना केंद्रीय दलाकडून प्रशिक्षण देण्यात आले. मात्र ‘एसडीआरएफ’ प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी पूर्ण नियोजनाची मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, की गृहसचिव किंवा पोलीस महासंचालक, यापैकी कोणाकडे सोपवावी, याबाबत निश्चिती न झाल्याने त्याचे काम प्रलंबित राहिले होते. अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे ही जबाबदारी सोपविण्याचे ठरले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या नागपूर व धुळे या ठिकाणी कार्यरत असणार असून, त्यासाठी एकूण ४२८ अधिकारी व जवानांचा समावेश असणार आहे. त्यापैकी एसआरपीमधून २८८ जणांची प्रतिनियुक्ती केली असून, उर्वरित पदांच्या भरती अद्याप करावयाची आहे. >अपर महासंचालकांकडून केली जाणार पूर्तता ‘एसडीआरएफ’साठी लागणारा निधी, साहित्य, प्रशिक्षणांचे नियोजन करणे तसेच अधिकारी व जवानांचा गणवेष, त्यांना पुरवावयाची वाहने, अस्थापनाविषयक बाबीचे निर्णय डीजीकडून घेतले जातील. त्यांच्या सूचनेनुसार राज्य राखीव दलाच्या अपर महासंचालकांकडून त्याबाबतची पूर्तता केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.