शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

जेजुरी बाजारतळावर घाणीचे साम्राज्य

By admin | Published: May 21, 2016 1:16 AM

तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे. तेथे व्यापारी व बाजारकरूंसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बाजारतळात आधुनिक सोयीसुविधांची अपेक्षा आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने कुलदैवत खंडोबाचा रविवार हा वार असल्याने दर रविवारी देवदर्शनासाठी राज्यभरातूनच नव्हे तर जेजुरी परिसरातील खेड्यातून भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर या अनास्थेवर टकालेला प्रकाश.रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस होता. दर रविवारी येथे आठवडे बाजार भरत होता. आता मात्र जेजुरीत रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने गेल्या वर्षीपासून जेजुरी नगरपालिकेने रविवारऐवजी गुरुवारचा आठवडे बाजार केला आहे. शहरातील मध्यवस्तीतील सुमारे एक एकर क्षेत्रावर हा बाजार भरतो. आज ती जागाही कमी पडू लागली आहे. बाजूलाच जिल्हा परिषदेची सुमारे दोन एकर मोकळी जागा आहे. त्या जागेत ही बाजार भरू लागला आहे. बाजाराला जागा कमी पडत असल्याने पालिकेने जिल्हा परिषदेच्या या जागेवरच नवीन विकास आराखड्यात आरक्षण टाकून आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)>वर्षाला १६ लाख रुपयांचे उत्पन्नपालिकेने बाजारतळाची जागा मोठी करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला असला तरीही येथे बाजारकरूंना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे मात्र दुर्लक्षच केलेले आहे. या बाजारतळातून पालिकेला बाजारकरापोटी वर्षाला सुमारे १६ लाख रुपयांचे मोठे उत्पन्न मिळते. मात्र त्या बदल्यात सुविधा दिल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परिसरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पालिकेने बांधलेल्या ओट्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.पावासाळळ्यामध्ये बाजार करताना शेडची सुविधा उपलब्ध नाही.४तुटक्या ओट्यावरच माल मांडून विकावा लागतो. बाजारात येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही की स्वछतागृहही नाही. जे आहे त्याची ही मोठी दुरवस्था असल्याने त्याचा वापरही कोणी करत नाही. बाजारात प्रवेश करण्यासाठी अरुंद रस्ते असल्याने बाजाराची वाहने तळाकडे नेणे मोठे जिकिरीचे झालेले आहे. मोकळे पटांगण असूनही लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. येथे मोठे व विस्तीर्ण पटांगण असूनही योग्य नियोजन आणि सुविधा नसल्याने बाजारकरूंचे मोठे हाल होत आहेत. याकडे पालिकेने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाजारातील व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. आमच्याकडून बाजारकर वसूल केला जातो. त्याच्या बदल्यात आम्हाला सुविधा मात्र मिळत नसल्याच्याच तक्रारी नागरिकांनी आहेत.