शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 1:04 PM

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराचे संकट टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१३ मीटरपेक्षा जास्त ठेवू नये, अशी विनंती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने कर्नाटकला केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाचनंतर अलमट्टीतून एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, बदलत्या पर्जन्यमानाचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून आणि आंतरराज्यीय समन्वय बैठकीत चर्चा केल्यानुसार, पुरेशी पातळी राखावी आणि नियमन करावे. उप-खोऱ्यातील सुरळीत निरीक्षणासाठी धरणातून विसर्ग वाढवावा. अलमट्टी धरणात दि. १५ ऑगस्टपर्यंत ५१३ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळी ठेवू नये.त्यानुसार अलमट्टी जलाशयाच्या अधीक्षक अभियंत्यांनी बुधवारी सायंकाळी पाचनंतर पाण्याचा विसर्ग एक लाख २५ हजार क्युसेकपर्यंत वाढविला आहे. सध्या अलमट्टी धरणात ८८.५०३ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीपातळी ५१७.३२ मीटर आहे. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरणात एक लाख चार हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

अलमट्टीतील अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय : मिलिंद नाईक

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका पोहोचू नये, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. अलमट्टीतील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी रोज संपर्क आहे. जल आयोगाच्या नियमानुसार ५१३ मीटर पाणीपातळी ठेवण्यासाठीही विनंती केली आहे. अलमट्टी धरणात एक लाख चार हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी दिली.

चार दिवस पावसाचेहवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात दि. १७ जुलैपर्यंत संततधार पाऊस सुरूच राहील, असा अंदाज आहे. कोयना, वारणेसह राधानगरी, धोम, कण्हेर या पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. यामुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा महापूर टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग दोन लाख क्युसेक करण्याची गरज आहे, असे मत सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस