शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:36 AM

दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.

मुंबई : दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी काही हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. आघाडी सरकारसारखे टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून आम्ही थांबलो नाही. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल व आदेशांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ७५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव राज्याने पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.राज्यातील ५० लाख शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांची नावांनिशी यादी आमच्याकडे तयार आहे. बोंडअळीग्रस्त ३५ लाख शेतकºयांना २ हजार २८५ कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात देण्यात आली आहे. यापूर्वी इतकी मदत कधीही देण्यात आलेली नव्हती, असे ते म्हणाले.शहरी नक्षलवाद्यांबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्या विषयी पुराव्यासह पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आता निर्णय न्यायालय देईल. पत्र परिषदेला भाजपा-शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस