शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:02 IST

Disha Salian Case: सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या मुद्य्यावरून आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. एकीकडे या प्रकरणाच्या चौकशीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आग्रही मागणी होत असतानाच दुसरीकडे ठाकरे गटानेही आपल्या युवानेत्यावर होत असलेल्या आरोपांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी समोर येत या आरोपांबाबत कोर्टात उत्तर देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं घराणं, आमच्या घराण्याचा सहा सात पिढ्या ह्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काही तथ्य नाही आहे. दूर दूर तक कोई संबंध नही, म्हणतात त्याप्रमाणे या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबध नाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून बेछूट आरोप करत असलेल्या विरोधकांनाही इशारा दिला.  राजकारण जर या वाईट बाजूने न्यायचं असेल, तर मग मात्र सगळ्यांचीच पंचाईत होईल, कारण खोट्याचा जर तुम्ही नायटा करणार असाल, तर ते तुमच्यावरही बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना सांगतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणी झालेल्या आरोपांबाबत आपली बाजू मांडताना  आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे कोर्टातच बोलू. माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. पाच वर्षापासून हेच चालू आहे. पण कोर्टात जे होईल ते होईल. पाच वर्षापासून मी यावर मुद्द्याचं बोलत आलेलो आहे आणि बोलत राहणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले होते.  

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना