शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"Boss Always Right! उद्धव ठाकरेंनी निर्णय का, कशासाठी घेतला याचा विचार करायचा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:19 IST

मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केले आहे.

कोल्हापूर - हातकंणगले मतदारसंघावरून शिवसेनाउद्धव ठाकरे गटात नाराजी उफाळून आली आहे. अलीकडेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर या भेटीवर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेतला. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांना उमेदवारी देऊ नका असं त्यांनी थेट म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यावर आता ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांना चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन केले आहे.

उपनेते संजय पवार म्हणाले की, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधवांना कमी करून नवीन २ जणांनी नियुक्ती केली आहे. जिल्हाप्रमुख पदावर नेमणूक आणि कमी करणे हा अधिकार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. १८-१९ वर्ष मुरलीधर जाधवांनी शिवसेनेत काम केले. चांगले केले हे सर्व ठीक आहे. परंतु आता अशी वेळ आहे की आपण पक्षाला काहीतरी दिले पाहिजे. मातोश्रीवर कुणी जायचे, भेटायचे हा अधिकार कुठल्याही शिवसैनिकाचा अथवा पदाधिकाऱ्याचा नसतो. तो अधिकार उद्धव ठाकरेंचा असतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. पक्षासोबत राहा. पक्षाने आपल्याला भरपूर दिलेले आहे. भविष्यातही प्रत्येक शिवसैनिकांची कदर करणारे उद्धव ठाकरे आहेत. तुम्ही त्यांचा विचार करा. त्यांच्या पाठिशी तुम्ही ठाम राहा. हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धव ठाकरेंनी का घेतला, कशासाठी घेतला याचा विचार आपण करायचा नसतो. Boss is always right महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे निर्णय घेतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे असं सांगत संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांना आवाहन केले आहे.

काय म्हणाले मुरलीधर जाधव?

२०१४ ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता. राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती असं जाधव यांनी म्हटलं. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे. पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, १९ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल असा इशारा जाधव यांनी दिला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना