शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

अभ्यास मंडळ, कार्यगट, तज्ज्ञ समित्या बरखास्त

By admin | Published: April 26, 2016 5:52 AM

अभ्यास मंडळ, लेखन गट, कार्यगट आणि तज्ज्ञ समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज घेतला.

मुंबई : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य मंडळ आणि बालभारती या संस्थांमध्ये अस्तित्त्वात असलेली अभ्यास मंडळ, लेखन गट, कार्यगट आणि तज्ज्ञ समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज घेतला. इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतचे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यसाहित्य, शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन व लोक सहभागासाठी निर्णय घेण्याकरता विषयनिहाय तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास मंडळे असतील. ती शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नेमण्यात आलेल्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या अखत्यारित काम करतील. या मंडळांतील सदस्यांची निवड आॅनलाइन/ जाहिरात पद्धतीने अर्ज मागवून करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी, राज्यातील अभ्यासक्रमांची काठीण्यपातळी वाढविणे व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने संरचनात्मक बदल करण्यात येणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ते पूर्ण कार्यक्षम होऊन काम सुरू करेपर्यंत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने समन्वय राहावा यासाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज समिती नेमण्यात आली. पाठ्यपुस्तक छपाईचे कार्य पूर्वीप्रमाणे बालभारतीच करेल, रॉयल्टीबाबत प्रचलित धोरण कायम राहील, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)