शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ

By admin | Published: February 06, 2015 2:17 PM

हिंदू, कोसला या कादंबरीमधून मराठी साहित्यप्रेमींच्या मनात स्थान पटकावणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - हिंदू, कोसला या कादंबरींमधून मराठी साहित्यप्रेमींच्या मनात स्थान पटकावणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले नेमाडे हे मराठी साहित्यातील चौथे साहित्यिक ठरले आहेत. 

जळगावमधील सांगवी येथे जन्म झालेले भालचंद्र नेमाडे हे कादंबरीकार, कवी व समीक्षक म्हणून ओळखळे जातात. सुरुवातीला नियतकालिकांमधून कविता लिहीणारे भालचंद्र नेमाडे यांचे ५० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले कोसला हे पुस्तक चांगलेच गाजले. आशय व अविष्कार या बाबतीत ही कादंबरी आजच्या तरुण वाचकानांही भावते हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. कोसलानंतर बिढार, जरीला व झूर या कांदबरींचे त्यांनी लेखन केले. २०११ मध्ये प्रकाशित झालेली हिंदू ही कादंबरी साहित्य विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भालचंद्र नेमाडे यांनी अथक प्रयत्न केले. शुक्रवारी भारतातील साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भालचंद्र नेमाडेंना जाहीर करण्यात आला. १० लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  

मराठी साहित्यामध्ये यापूर्वी विष्णू सखाराम खांडेकर (१९७४), विष्णू वामन शिरवाडकर (१९८७) आणि  विंदा करंदीकर (२००३) या तिघा साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.