शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

काँग्रेस नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी

By admin | Published: March 11, 2016 4:12 AM

राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे

मुंबई : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे. पुण्यासह त्यांच्याकडे साताऱ्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे, तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग आणि ठाणे हे दोन जिल्हे सोपवून शिवसेनेशी खुले दोन हात करण्यास मोकळे सोडले आहे.त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय गणिते सांभाळून खा.चव्हाण यांनी प्रत्येकाला जबाबदारी तर दिली आहे, शिवाय महत्त्वाचे नेते जिल्ह्यामध्ये कसे मग्न राहतील, याचीही खबरदारी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. त्या पार्श्वभूमीवर वाद होणार नाहीत, पण पक्षाचे कामही अडणार नाही, याची काळजी घेत विखेंना उत्तर अहमदनगर, नाशिक आणि अमरावती हे तीन जिल्हे देण्यात आले असून, थोरातांना दक्षिण अहमदनगर आणि उस्मानाबादची जबाबदारी दिली गेली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री राहिलेले विखे, थोरात यांना वगळून या जिल्ह्याची धुरा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली आहे. खा. राजीव सातव यांना हिंगोलीची, तर लातूर, बीड या दोन जिल्ह्यांची जबाबदारी आ. अमित देशमुख यांच्याकडे दिली आहे. नेहमी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या पतंगराव कदम यांना सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित केले आहे, तर डी.पी. सावंत यांना नांदेड आणि परभणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पालघर रोहिदास पाटील यांच्याकडे तर गडचिरोली व नागपूरची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. भंडारा, गोंदियाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. काही जिल्ह्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय व्हायचे आहेत, शिवाय जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत तीही संपेल, असे खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्यांंचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे, त्यांना आधी बदलले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)