शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

‘दारूसाठी रस्त्यांची मालकी बदलू नका’

By admin | Published: April 18, 2017 5:48 AM

सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा हा विषय समोर ठेऊन राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दारु दुकाने व बीअरबार बंद करण्याचे आदेश दिलेले असताना

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा हा विषय समोर ठेऊन राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दारु दुकाने व बीअरबार बंद करण्याचे आदेश दिलेले असताना हे महामार्गच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करून पळवाट काढून दारू विक्रीला प्रोत्साहन देऊ नका, असे पत्र परिवहन मंत्री आणि राज्य रस्ते सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.या पत्रात रावते यांनी म्हटले आहे की, रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांपासून ५०० मीटरच्या आतील दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यात काही ठिकाणी उदा. धुळे, मुंबई येथे राज्य महामार्ग हे महापालिका किंवा एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्य ठिकाणीही तसे प्रस्ताव आहेत. अशा निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान याचिका प्रकरणास सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा दारुबंदीसंदर्भात नाही तर रस्ते सुरक्षिततेसंदर्भातील आहेत, ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची (महापालिका, नगरपालिका) स्वत:च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची आर्थिक परिस्थिती नसताना त्यांच्याकडे महामार्ग हस्तांतरीत करण्यामुळे महामार्गांची अवस्था बिकट होऊन अपघात वाढण्याची शक्यता असल्याचे रावते यांनी या पत्रात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)