शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
5
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
6
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
7
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
8
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
9
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
10
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
11
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
14
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
15
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
17
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
18
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
19
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
20
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही

शेतकऱ्यांना चोरांच्या रांगेत उभे करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 6:16 AM

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास मनाई करून

नंदकिशोर पाटील / मुंबई ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास मनाई करून, रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने देशभरातील तमाम शेतकऱ्यांना काळे पैसेवाल्यांच्या यादीत समाविष्ट करून टाकले. सरकारच्या या निर्णयाची संभावना ‘चोर सोडून संन्याशांवर संशय’ या प्रकारात मोडणारी आहे.चलनवाढ असो की चलन तुटवडा, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक चक्रात सर्वात अगोदर कृषिव्यवस्था भरडली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा देखील पहिला फटका शेतकऱ्यांनाच बसला. शेतातील भाजीपाला घेऊन शहरांकडे निघालेल्या शेतकऱ्यांना न रस्त्यात कोणी डिझेल भरू दिले; ना दुसऱ्यादिवशी भाजी खरेदीला कोणी आले. बाजारातील नाणेटंचाईमुळे ग्राहक न आल्याने सलग तीन-चार दिवस भाजीपाला रस्त्यांवर फेकून द्यावा लागला. आडत दुकानांवर आणलेला शेतीमाल पडून राहिला. बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प झाले तर किरकोळ दूध विक्रेत्यांना दूध रस्त्यावर फेकून द्यावे लागले. अशाप्रकारे चहुबाजुंनी शेतकऱ्यांची आर्थिक दमकोंडी झालेली असताना सरकारने जिल्हा बँकांचे दरवाजे बंद करून टाकले.महाराष्ट्रापुरता विचार केला तर या निर्णयाचा फटका ३१ जिल्हा बँकांच्या सुमारे ४ कोटी ९९ लाख खातेदारांना बसला आहे. तसे तर सुरवातीपासूनच जिल्हा बँकांवर केंद्र सरकारची वक्रदृष्टी होती. जुन्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वित्त मंत्रालयाने ८ नोव्हेंबरच्या रात्री काढलेल्या परिपत्रकात या बँकांचा उल्लेख कटाक्षाने टाळण्यात आला. ही बाब आरबीआयच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ९ नोव्हेंबरच्या रात्री त्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत या बँकासमोर पैसे भरण्यासाठी आणि जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या. ग्रामीण भागात जिल्हा बँकांशिवाय दुसरी सोय नसताना १४ नोव्हेंबरच्या दुपारी आरबीआयने ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्यास किंवा त्या खातेदारांच्या खात्यात जमा करून घेण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मनाई केली. त्याचवेळी जिल्हा बँकांच्या खातेदारांनाही खात्यातून पैसे काढण्यावर आठवड्याला २४ हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू केली. ही मर्यादा २४ नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. मात्र जिल्हा बँकांची जी इतर बँकांमध्ये खाती असतील त्यांना ही मर्यादा लागू नाही व जिल्हा बँका आपल्या खातेदारांना वरील मर्यादेत पैसे अदा करण्यासाठी इतर बँकांमधील आपल्या खात्यांमधून गरजेनुसार कितीही रक्कम काढू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. थोडक्यात, पैसे काढता येतील, मात्र भरता येणार नाहीत!जिल्हा बँकांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काळा पैसा जमा होत आहे, किंवा जमा होईल अशी खरोखरच सरकारच्या मनात शंका आहे का? आणि जर असेल तर सरकार कारवाई करू शकते. त्यासाठी बँकांचे दरवाजे बंद करण्याची गरज नव्हती. तसेही अडीच लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यावर जमा झाल्यास आयकर खात्याकडून विचारणा होणारच आहे. जर सगळी सरकारी यंत्रणा डोळ्यांत तेल घालून बँकांच्या व्यवहारवर लक्ष ठेऊन असेल, तर मग शेतकऱ्यांवर अप्रत्यक्ष वहिम ठेऊन त्यांना काळा पैसेवाल्यांच्या यादीत ढकलून सरकारने काय साधले?