शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

‘बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा पायंडा पाडू नका’

By admin | Published: January 15, 2016 1:06 AM

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सरकारवर टीकेची झोड उठवली. ही बांधकामे नियमित

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सरकारवर टीकेची झोड उठवली. ही बांधकामे नियमित करून राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्राला काय संदेश देणार आहे? दंड आकारून बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा पायंडा पाडू नका. राजकीय दबावाखाली येऊन बांधकामे नियमित करू नका. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे काय परिणाम होतील, याचा विचार करावा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर टीका केली. नवी मुंबईतील दिघा गावातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयांत दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती. राज्य सरकारने गुरुवारच्या सुनावणीवेळी नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याबाबतच्या धोरणाचा मसुदा खंडपीठापुढे सादर केला.या प्रस्तावात ेस्थानिकांच्या परिस्थितीचा दाखला देत, सरकारने राहत्या घरांवर जादा कर आकारून ही घरे नियमित करण्याच्या प्रस्ताव खंडपीठापुढे सादर केला. मात्र या प्रस्तावावर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर धरले. या बांधकामांना नियमित केलेत तर वसई-विरार, पिंपरी-चिंचवड, भिवंडी- निजामपूर येथील रहिवाशीही हिच मागणी करतील. शहर नियोजन विस्कळीत होईल. बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याच्या निर्णयावर सरकारने पुनर्विचार करावा,’ असे खंडपीठाने म्हटले.मुंबईवरील ताण कमी होण्यासाठी सरकारने नवी मुंबईची निर्मिती केली. त्यासाठी भूसंपादन केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या भूखंडापैकी १२. ५ टक्के भूंखडही सरकारने दिला. हा सगळा उपद्वयाप कशासाठी केलात? अशाप्रकारे जमिनी घालवण्यासाठी? बेकायदेशीर बांधकामांसाठी? अशा शब्दांत खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले.स्थानिकांची परिस्थिती पाहता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. मात्र त्यासही खंडपीठाने विरोध केला. , असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केलेल्या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा अधिकार सरकारला कसा? कायद्यात तशी तरतुद कुठे आहे? असा सवालही खंडपीठाने केला.या लोकांचे येथेच पुनर्वसन करणे शक्य नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी करण्यात येणे शक्य आहे का? अशीही विचारणा खंडपीठाने केली. या मसुद्यावर पुनर्विचार करून नवा मसुदा २१ जानेवारीला सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.