शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

भाषण नको, आधी सातबारा कोरा करा, शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना सुनावले

By admin | Published: June 04, 2017 5:50 PM

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांना नागपुरात आयोजित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 4 - राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना नागपुरात आयोजित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. सिंह यांचे भाषण सुरू असताना गर्दीतील एका शेतकऱ्याने उभे राहून " तुमचे भाषण बंद करा, आधी आमच्या दुधाला ४० रुपये लिटर भाव द्या व सातबारा कोरा करा," असे सुनावले. सिंह यांनी मात्र त्या शेतकऱ्याची साधी दखलही घेतली नाही. मात्र, उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्या शेतकऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

 

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड व मदर डेअरी यांच्या संयुक्त विद्यामाने नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते डेअरी संयत्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सभागृह शेतकऱ्यांची खचाखच भरले होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. या वेळी राधा मोहन सिंग आपल्या भाषणात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काय केले याचा पाढा वाचणे सुरू केले. त्यांचे भाषण सुरू असताना सभागृहात एक शेतकरी उभा झाला. आम्हाला तुमचे भाषण नको, दुधाला ४० रुपये लीटरचा भाव जाहीर करा, आमचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करा, अशी मागणी केली. मात्र, त्याच्या मागणीकडे लक्ष देता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

त्या शेतकऱ्यानेही माघार घेतली नाही. शेतकऱ्याने आखणी जोरात आपली मागणी रेटून धरली. सुमारे तीन चे चार मिनीट मंचावरून केंद्रीय कृषी मंत्री तर सभागृहात संबंधित शेतकरी असे दोन भाषण सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. शेवटी दोन पोलीस त्या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या जवळपास आले. पण तसे केले तर आणखी गोंधळ वाढेल म्हणून ते माघारी फिरले. शेतकऱ्याचा आवाज सुरूच होता. त्याच्या मागणीला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पाठिंबा दिला. शेवटी नितीन गडकरी यांनी संब्धित शेतकऱ्याला इशारा केला व राधा मोहन सिंग यांचे भाषण संपता संपता तो शेतकरी जागेवर बसला. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आपले भाषण संपविताना ह्यअसे काही अपवाद वगळले तर उर्वरित शेतकऱ्यांना भेटण्याचे सौभाग्य आपल्याला लाभलेह्ण, असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षपणे मागणी करणाऱ्या त्या शेतकऱ्यावर टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मात्र शेतकऱ्यांनी शांतपणे ऐकूण घेतले. शेतकरी संपावर राधा मोहन सिंह यांचे मौन  राज्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह शनिवारी रात्रीच नागपुरात आले. रविवारी सायंकाळी ५ पर्यंत ते नागपुरात होते. या दरम्यान प्रसिद्धी माध्ययमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी वारंवार संपर्क केल्यानंतरही सिंग यांनी संपावर एक शब्दही बोलणे टाळणे. कार्यक्रमातही त्यांनी शेतकरी संपाचा साधा उल्लेखही केला नाही.