शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

उर्मट वाहनचालकांवर भर रस्त्यात कारवाई नको!

By admin | Published: January 20, 2016 2:35 AM

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त आणि उर्मट वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात.

मुंबई: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त आणि उर्मट वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. हे टाळण्यासाठी आता आगळी शक्कल लढविली जाणार आहे. घटनास्थळावर त्यांच्यावर कारवाई न करता, केवळ त्यांची माहिती घेऊन सोडले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अशा लोकांवर पोलीस ठाण्यात बोलावून कारवाई करावी, अशी सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केली आहे.राज्य पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांनी त्या बाबत कर्मचाऱ्यांकडून त्यांची अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वर्दळीच्या ठिकाणी वारंवार वाहनधारकांची पोलिसांबरोबर होत असलेल्या वादावादीचे प्रकार बंद होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यावर त्याला अडविणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांकडून सर्रासपणे त्याच ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाते, अशा वेळी वाहनचालक वाद घालत राहिल्याने त्यांच्याजवळ अन्य नागरिकही जमा होतात. त्यामुळे थोड्या वेळात परिसरात मोठी गर्दी होऊन बिकट परिस्थिती निर्माण होते. कधी-कधी त्याचे पर्यवसान जमावाकडून पोलिसांना शिवीगाळ, मारामारी होईपर्यंत जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी हुज्जत घालणाऱ्या संबंधित वाहनचालकावर तातडीने कारवाई न करता, त्यांचे नाव, गाडीचा नंबर, मॉडेल, मोबाइल नंबर आदीबाबतची माहिती नोंदवून घेत त्यांना तेथून जाऊ द्यावे. या प्रकारे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हाप्रमुखांनी पोलिसांनी या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आदेश महासंचालक दीक्षित यांनी अधिकाऱ्यांना बजाविले आहे. (प्रतिनिधी)