शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Published: December 06, 2015 7:33 PM

गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ६ - गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही, दुष्काळी परिस्थिती ओळखून आधीच उपाययोजना सुरु केल्या होत्या, शिवाय, केंद्राला आपला प्रस्ताव वेळेत गेला आहे असे मत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत मांडले. हिवाळी अधिवेशनाआधी होणारा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर लांबणीवर पडला आहे.  मंत्रीमंडळाचा विस्तार राज्यातील हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात होत आहे. ठाणेतील प्रसिद्ध बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी विरोधकांनी पुरावे द्यावेत, दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे  असा टोला त्यांनी विरोधकाला लगावला. तर राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण घटल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला.
 
राज्यातील एकाही घटकाचे समाधान न करू शकणा-या अपयशी सरकार सोबत चहापान कशाला घ्यायचे असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महागाई, विदर्भ विकास, डाळ घोटाळा, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगीतले.
 
>मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
> यंदा राज्यात डाळींच्या उत्पन्नात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे
> दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना, मदतीसाठी केंद्राची वाट पाहणार नाही
> महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भात व्यक्त केलेलं मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे
> विरोधकांना चर्चा नव्हे तर राजकारण करावे 
> दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे