शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

।। घातला भार तुझीया माथा न भिये सर्वथा...।।

By admin | Published: June 28, 2017 1:43 AM

वय वाढले की चिंता वाढतात, काहींच्या मिटतात. वाढते वय म्हणजे निवृत्तीचे वय. या आयुष्यात आसक्ती तरी कशाची राहणार?

गोपालकृष्ण मांडवकर । लोकमत न्यूज नेटवर्क‘तुझीया बळ पंढरी नाथा,झालो निर्भर तुटली व्यथा ।घातला भार तुझीया माथा, भिये सर्वथा तुका म्हणे ।।’वय वाढले की चिंता वाढतात, काहींच्या मिटतात. वाढते वय म्हणजे निवृत्तीचे वय. या आयुष्यात आसक्ती तरी कशाची राहणार? सुख-दु:खाच्या धाग्याने विणलेल्या या आयुष्यात जे मिळाले त्यातही विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून समाधानाने डोळे मिटण्याची आंतरिक लालसा नसेल तो सच्चा वारकरी कसा?असेच एक आजोबा ज्ञानोबारायांच्या दिंडीत भेटले. वय वर्षे ८०. डोक्याला पागोटे बांधून काठी टेकवत पुढे निघालेल्या या वारकऱ्याचे नाव रंभाजी खेडे. परभणी जिल्ह्यातील सावरखेडा येथून पायी निघालेल्या या वारकऱ्याची ही ४० वी वारी आहे. वारीची कॅलेंडरवरील तारीख बघून ही माऊली एकटीच निघाली प्रवासाला!या वयातही कशाला वारी करता, या प्रश्नावर ते म्हणाले - ‘दिंडी जाताना पाहून मनाला बरे वाटत नाही. सतत विठ्ठलाचा ध्यास लागतो.’ विठ्ठलाकडे काय मागणार, या प्रश्नाच्या उत्तरात या वारकऱ्याची निष्काम भक्ती दिसली. ते म्हणाले, ‘त्याला काहीच मागणार नाही, चंद्रभागेवर जाणार, दर्शन करणार आणि परत येणार.’ ते तीन आठवड्यापासून ज्ञानोबा माऊलींच्या दिंडीत पायी वारी करीत आहेत. गावाहून निघाले तेव्हा पाऊस पडून गेला होता. गावाकडच्या ख्याली-खुशालीसाठी खिशात मोबाईलही नाही. शेतमळा आणि घरदाराची चिंता विठ्ठलावर सोडून वारीला निघालेल्या या माऊलीला पाहिल्यावर तुकोबारायांच्या अभंगातील या ओळी सार्थ ठरल्या-‘हेचि दान दे गा देवा,तुझा विसर न व्हावा।गुण गायीन आवडी,हेचि माझी सर्व जोडी।।