शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Published: June 28, 2017 1:40 AM

रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप करत संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करण्यात यावे, अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे.पुण्याच्या हडपसर येथील संजीवनी रुग्णालयात आरती कदम (३०) यांना आॅगस्ट २०१६ मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांचे पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी त्यांना ‘पेनकिलर’ इंजेक्शन दिले. मात्र त्या इंजेक्शनला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला त्यांच्या पतीला दिला. यादरम्यान आरती यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरती यांचे पती अभिजित कदम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात डॉ. उत्तम ताम्हाणे, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. संजय लाडकट, डॉ. रुपाली गुजराथी व परिचारिका मनीषा मांडलिक व सविता भांडेकर यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून सर्वांवर आयपीसी कलम ३०४ (भाग-२) (सदोष मनुष्यवध) गुन्हा नोंदवला व त्यानंतर दोषारोपपत्रही दाखल केले.मात्र पोलिसांनी चुकीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी डॉक्टरांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यांना कोणीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.