शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 10:56 AM

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली होती. परंतु उपोषणावर आपण ठाम असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलंय.

Manoj Jarange Patil News: लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. यातच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपण मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे. 

"आपण शांततेत आंदोलन करू शकता असा अधिकार घटनेनं जनतेला दिलेला आहे. त्यामुळे शांततेत आमरण उपोषण मी करतोय. मी घटनेला मानायला लागलो. कायदा चालवून घेणाऱ्यांना आता मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसवलंय, ते कायदा पायदळी तुडवायला लागलेत," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

"४ जूनला आचारसंहिता होती, मी त्याचा सन्मान केला. मी माझं आंदोलन ८ तारखेला पुढे ढकललं. पुन्हा पुन्हा नाकारणार असाल, तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. कायद्याला मी मानतो आणि घटनेनं, कायद्यानं मला तो अधिकार दिलेला आहे. मी ८ जूनला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि मी मागे हटणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

परवानगी नाकारली 

मिळालेल्या माहितीनुसार, सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसंच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  

ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध का? 

मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसंच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 'हे आंदोलन भरकटत चाललं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांशी बोलत नाहीत,' असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केलाय.    

दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचं समजते. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागली असल्यानं मनोज जरांगे यांना आंदोलन करता आलं नाही. आता ८ जून रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण