शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

भूसंपादनातील अडचणी निकाली, दोंडाईचा सौरऊर्जा प्रकल्पाला अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट म्हणून मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:16 IST

हाराष्ट्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०१५ अंतर्गत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निकाली काढण्यात आल्या असून, या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०१५ अंतर्गत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निकाली काढण्यात आल्या असून, या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा ५०० मेगावॉटचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला मान्यता मिळणार आहे. हा प्रकल्प महानिर्मिती पूर्ण करणार असून, पूर्ण प्रकल्पासाठी एकूण १,०२४ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी ८२५ हेक्टर जमीन महानिर्मितीने विकत घेतली आहे. महानिर्मितीला राज्यात २,५०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प निर्मितीचे लक्ष्य देण्यात आले असून, त्यापैकी ५०० मेगावॅटच्या या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे. महानिर्मितीने ८२५ हेक्टर खासगी जागा विकत घेतली असून, मेथी आणि विकरण या दोन गावांतील ही जमीन आहे. भूसंपादनाचे १४.६३ कोटी महानिर्मितीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहेत.केंद्र शासानाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने धुळे जिल्ह्यातील या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम केंद्र शासनाची प्राधिकृत असलेली सेकी ही संस्था करणार आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेच्या शासकीय परिपत्रकानुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाडा भागासाठीही एक ५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आली.१६० कोटींचा खर्च- दोंडाईचा हा सौरऊर्जेचा ५०० मेगावॅटचा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिला टप्पा २५० मेगावॅटचा मार्च २०१९ पर्यंत पूर्ण केला जाईल. दुसरा २५० मेगावॅटचा टप्पा २०२१-२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. १६० कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला होणार आहे.प्रकल्पासाठी लागणारी वीजवाहिनी टाकण्याचे काम महापारेषण करणार आहे. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज वाहून नेऊन महापारेषणच्या उपकेंद्रात आणली जाईल आणि तेथून ती शेतकºयांना दिली जाईल. ही वीजवाहिनी १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा कालावधी महापारेषणला देण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे