शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका; काँग्रेसला पुन्हा जयंत पाटील यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 13:00 IST

राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे.

औसा (जि. लातूर) : काँग्रेसला आम्हाला सोडायचे नाही, मात्र तुम्हीही कोठे जाऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी औसा येथे कार्यक्रमात दिला. सध्या महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाचे फारच चालले आहे. त्यावर काय बोलावे म्हणून आम्ही गप्प आहोत. तुम्हाला कधीच दूर करायचे नाही. तुमच्याशिवाय आमचे नाही आणि आमच्याशिवाय तुमचे नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहोत. आमच्या मनात वेगळे असे काही नाही. आम्हाला तुमच्याबरोबरच जायचे आहे, असे पाटील म्हणाले.

राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. निवडणुकीनंतर ही महाविकास आघाडी झाली असून, तिन्ही पक्ष एकत्रित चांगले काम करत आहेत.  

आम्हालाही सोबत घ्या

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. पण दोघांचाच बोलबाला दिसत आहे. आघाडीत काँग्रेसही आहे. आम्हालाही तुमच्यासोबत घ्या, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस