शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 7:40 PM

राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे असं काँग्रेसनं म्हटलं.

बुलढाणा - आम्ही सरकारमध्ये एकत्र आलो तेव्हा आम्ही आमची भूमिका सोडावी, त्यांनी त्यांची भूमिका सोडावी असं कुठल्याही पक्षाने अट ठेवली नव्हती. काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. आमचे विचार स्पष्ट आहेत. आम्ही काय बोलावं, राहुल गांधींनी काय बोलावं याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला सांगू शकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे अशा शब्दात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुनावलं आहे. 

माणिकराव ठाकरे म्हणाले की, आम्ही त्यांना विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं. आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम आखला. जो जनहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यातील आमची भूमिका स्पष्ट होती. राहुल गांधींनी त्यांचा लेखी पुरावा दिला. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा विचार सावरकर विचारसरणीच्या लोकांनी केला. हिंदू, मुस्लीम एकत्र राहू शकत नाही अशाप्रकारे विधाने, त्यांची भूमिका उघड आहे. काहींना माहिती आहे काहींना माहिती नाही. परंतु आता ते समोर येतंय. ठाकरेंमध्ये आणि आमच्यात वाद झाला नाही. त्यांची भूमिका ते मांडतायेत, आमची भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळे वाद झाला, आता सोबत येणार नाही वैगेरे या चर्चेला अर्थ नाही असं काँग्रेस नेते ठाकरेंनी सांगितले. 

त्याचसोबत राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे. धार्मिक द्वेषामुळे तिरस्कार होतो. ना मुस्लीम, ना हिंदु. ना बौद्ध असा विचार न करता राष्ट्राच्या हितासाठी सर्वांना जोडून पुढे जायला हवं. एका धर्माला अधिक प्राधान्य न देता सगळ्यांना सोबत घ्यायला हवं. देश एकसंघ ठेवायचा असेल तर भारत जोडो यात्रा यातून ते स्पष्ट होतंय. काँग्रेसला भाजपा जोडो विचार करायचा आहे तर विरोधकांना भारत तोडो असं करायचं आहे. धार्मिक तेढ निर्माण केले तर देशात सौख्य कसे राहील? हीच भूमिका राहुल गांधी यांच्या भारत जोडोची आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न देशाच्या हिताचे आहे. संसदेत चर्चा होत नाही. त्यामुळे हे प्रश्न भारत जोडोच्या माध्यमातून मांडले आहे असं माणिकराव ठाकरे म्हणाले. 

काय म्हणाले होते संजय राऊत?स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर