शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

दुष्काळग्रस्तांचे परीक्षा शुल्क माफ

By admin | Published: December 24, 2015 2:20 AM

राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणे : राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले आहे.शासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार संबंधित गावांतील दहावीतील मुलांचे परीक्षा अर्ज भरून घेताना त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात आले नाही. राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्यात आले नसल्याची माहिती राज्यातील सर्व विभागीय मंडळांकडून कळविण्यात आली आहे. त्यात नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून मुंबई, कोकण विभागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क माफ झाले नाही. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर ग्रामीण मधील १११ गावांमधील १३१ विद्यार्थ्यांचे आणि गडचिरोली जिल्ह्णातील ३६७ गावांमधील १ हजार ९०७ विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्णात एकही गाव दुष्काळग्रस्त नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळाली नाही.मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला व यवतमाळ जिल्ह्णात दुष्काळग्रस्त गावे आहेत. मात्र, या जिल्ह्णातील शाळांपर्यंत परीक्षा शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती न पोहचल्यामुळे या विभागातील सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणी करण्यात आली आहे. परंतु, जिल्हा प्रशासन स्तरावर हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचेही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)