शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हुंडाबळीच्या खटल्यातील पती, नणंद ३० वर्षांनी ठरले निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 05:53 IST

सर्वोच्च न्यायालय : विवाहितेने स्वत: जाळून घेतल्याचा निष्कर्ष

मुंबई : एमआयडीसी कॉलनी, चिंचवड येथील राहत्या घरात शारदा संपत काळे या विवाहितेचा ९८ टक्के भाजून झालेला मृत्यू हा खून नव्हे, तर आत्महत्या होती, असा निष्कर्ष नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात शारदाचा पती संपत बाबासाहेब काळे व विवाहित नणंद ताराबाई धनाजी धायगुडे यांची या घटनेनंतर ३० वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.

संपत व ताराबाई यांनी केलेली अपिले मंजूर करून न्या. शरद बोबडे व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ९ जुलै १९८९च्या पहाटे शारदा भाजली होती. उपचारादरम्यान तिचा पुण्याच्या ससून इस्पितळात मृत्यू झाला होता.

ससूनचे एक डॉक्टर डॉ. संजीव छिब्बर व विशेष न्याय दंडाधिकारी कमलाकर आढाव यांना शारदाने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीच्या आधारे संपत व ताराबाई यांच्यावर खून (भादंवि कलम ३०२) व नवविवाहितेचा छळ (४९८ए) या गुन्ह्यांसाठी खटला दाखल झाला होता. पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष सोडले. परंतु सरकारने केलेल्या अपिलात दोषी ठरवून उच्च न्यायालयाने दोघांनाही जन्मठेप ठोठावली. दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात याविरोधात अपील केले.

या खटल्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. उपलब्ध साक्षी-पुराव्यांची छाननी करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, संपत व ताराबाई यांनी शारदाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले नसावे तर तिनेच जाळून घेऊन आत्महत्या केली असावी, अशी प्रबळ शक्यता दिसते. याच संशयाचा फायदा देत आरोपींना निर्दोष सोडण्यात आले.

शारदाने दिलेल्या दोन्ही मृत्यूपूर्व जबान्या हा सबळ पुरावा मानून उच्च न्यायालयाने तेवढ्याच आधारे संपत व ताराबाई यांनीच शारदाचा खून केला, असा निष्कर्ष काढला होता. मात्र शारदा ९८ टक्के भाजलेली होती, तिला स्ट्राँग वेदनाशामक इंजेक्शन दिलेले होते व ती जबानी देण्याच्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी जबानी नोंदविण्याच्या आधी नव्हे, तर जबानी नोंदवून झाल्यानंतर दिले होते हे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने या मृत्यूपूर्व जबान्या संशयास्पद ठरविल्या.

उच्च न्यायालयाने १३ आॅक्टोबर २०१० रोजी शिक्षा ठोठावल्यापासून संपत तुरुंगात आहे. आता त्याची मुक्तता होईल. सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील लोणंद गावी राहणारी ताराबाई जामिनावर आहे. तिचा जामीनही आता रद्द होईल. या अपिलाच्या सुनावणीत आरोपींसाठी अ‍ॅड. उदय बी. दुबे यांनी तर राज्य सरकारसाठी अ‍ॅड. निशांत कतनेश्वरकर यांनी काम पाहिले.सौभाग्यलंकार ठेवले उशीखालीसंपत व शारदा यांचे घर दोन खोल्यांचे होते. शारदा आतील बाजूस असलेल्या स्वयंपाकखोलीत जळाली होती. घटनेनंतरच्या पंचनाम्यात मंगळसूत्र, नाकातील नथनी व पायातील पैंजण हे शारदाचे सौभाग्यलंकार शेजारच्या खोलीतील बिछान्यावर उशीखाली मिळाले होते. याचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, विवाहित स्त्री शक्यतो हे अलंकार काढून ठेवत नाही. परंतु शारदाचे ते अलंकार अंगावर नव्हे, तर उशीखाली मिळाले यावरून आत्महत्या करण्याचे ठरविल्यावर तिनेच ते काढून ठेवले असावेत, अशी प्रबळ शक्यता वाटते.

टॅग्स :dowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदा