शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

अधिवेशनावर दुष्काळी ढग

By admin | Published: March 09, 2016 6:23 AM

बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मागील अधिवेशनात प्रलंबित असणारी काही विधेयके पुन्हा मांडण्याचे व नवीन काही विधेयके मंजूर करून

मुंबई : बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मागील अधिवेशनात प्रलंबित असणारी काही विधेयके पुन्हा मांडण्याचे व नवीन काही विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोरदार नियोजन केले असले तरी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी हे अधिवेशन वादळी होणार, याचे संकेत दिले. राज्यातील १४ जिल्ह्यांत भीषण दुष्काळ असून, चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय, डान्सबार बंदी रोखण्यात सरकारला आलेले अपयश, पोलिसांवर होणारे हल्ले, बंद करण्यात आलेल्या चारा छावण्या, अत्यल्प खर्च झालेले बजेट आणि काही मंत्र्यांची बाहेर आलेली ‘प्रकरणे’ यावरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजवर लक्ष्य बनविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पैनगंगा प्रकल्पावरून कोंडी करण्याची व्युहरचना आखण्यात आली आहे. या प्रकल्पास सुधारित मान्यता देताना अव्वाच्या सव्वा किंमत वाढविण्यात आली आहे.कागदोपत्री हे अधिवेशन ४० दिवसांचे असले तरी यात १७ दिवस सुट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, सरकार अर्थसंकल्प मंजूर झाला की, अधिवेशन गुंडाळण्याच्या मानसिकतेत आहे. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे हैराण आहेत तर काँग्रेसमध्ये आक्रमकपणे बोलणाऱ्या नेत्यांचा अभाव आहे. दुसरीकडे शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी त्यांचे आमदार संधी मिळेल तेथे विरोधकांच्या भूमिकेत जाण्याची तयारी करुन बसले आहेत.आम्ही दुष्काळी पर्यटन केलं असा आरोप करणाऱ्या विरोधकांनी किमान नवीन काही शब्द तरी वापरायला हवे होते. विरोधी पक्षांचा आमचा अनुभव जादा आहे; कमी पडत असतील तर आमच्याकडून शब्द घ्या. कोणत्याही विषयावर चर्चेची आमची तयारी आहे.-देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीअधिवेशनाच्या तोंडावर घाईघाईने मंत्रिमंडळाने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्याचा दौरा केला. जानेवारी २०१६पासून आतापर्यंत तब्बल २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित होत असताना मुख्यमंत्री मात्र जुन्याच घोषणांची उजळणी करीत आहेत. मंत्र्यांच्या दुष्काळी पर्यटनाने जनतेच्या हाती काहीच लागले नाही.- राधाकृष्ण विखे, विरोधीपक्ष नेते