शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग

By admin | Published: August 13, 2014 2:28 AM

पावसाळा सुरू होऊन अडीच दोन महिने उलटल्यानंतरही मराठवाडयात अजून दमदार पाऊसच न झाल्याने विभागातील दुष्काळी स्थिती अधिक तीव्र झाली आहे.

पुणे : पावसाळा सुरू होऊन अडीच दोन महिने उलटल्यानंतरही मराठवाडयात अजून दमदार पाऊसच न झाल्याने विभागातील दुष्काळी स्थिती अधिक तीव्र झाली आहे. आतापर्यंत मराठवाडयात सरासरीच्या ५८ टक्के पाऊस कमी पडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आतापर्यंतच्या पावसाच्या स्थितीवरून मराठवाडयाला दुष्काळग्रस्त भाग संबोधले आहे.मराठवाडा वगळता राज्यात सगळीकडे चांगला पाऊस होत आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली आहे. कोकणात सरासरीच्या केवळ ७ टक्के पाऊस कमी आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १२ टक्के आणि विदर्भात सरासरीच्या १८ टक्के पाऊस कमी पडला आहे. चांगल्या पावसामुळे या भागांतील धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाला असून पिण्याच्या पाण्याचे संकटही दूर झाले आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यभर दुष्काळी स्थिती होती. पण जुलै महिन्यात झालेल्या पावसाने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तूट वेगाने भरली. पण या काळातही मराठवाड्यात मात्र पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. (प्रतिनिधी)