शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
4
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
5
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
6
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
7
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
8
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
9
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
10
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
11
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
12
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
13
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
14
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
15
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
16
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
17
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
18
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
19
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
20
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...

दुष्काळप्रश्नी मोदी-पवार भेट

By admin | Published: September 15, 2015 1:58 AM

महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातल्या दुष्काळाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. जवळपास ३० मिनिटांच्या या भेटीत पवारांचे म्हणणे ऐकून त्यातल्या प्रमुख मागण्यांत लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले मात्र कोणतीही ठोस घोषणा केली नाही.पंतप्रधानांच्या भेटीत पवारांनी मुख्यत्वे खरीपाची पिके नष्ट झाल्यामुळे निर्माण झालेली स्थिती, चारा वाटपाचा प्रश्न इत्यादी विषय मांडले. याखेरीज साखर निर्यातीचा प्रश्न मुख्यत्वे उपस्थित केला. पवार म्हणाले, राज्यात साखरेचे साठे पडून आहेत. राज्यातून ३0 हजार टन साखर निर्यात झाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यासाठी केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंब, संत्री व द्राक्षबागांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही केंद्र व राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. मुंबईत सीआरझेड कायद्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांकडेही पवारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.दुष्काळग्रस्त भागाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या जेल भरो आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, ‘हे जेल भरो आंदोलन नसून जेलसे रोको आंदोलन आहे’. त्यावर भाष्य करण्यास नकार देत पवार इतकेच म्हणाले, शेलारांना दुष्काळचे गांभीर्य कळते का? मराठवाड्यात प्रत्यक्ष जाऊ न दुष्काळ म्हणजे नेमके काय, ते कधी त्यांनी पाहिले काय? आंदोलनापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना भेटून दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही म्हणून रस्त्यावर उतरावे लागले. शेलार यांच्या पोरकट विधानांमुळेच १० महिन्यांत लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला, हे त्यांनी लक्षात घ्यावे. विखे-पाटील यांना कोपरखळीपंतप्रधानांच्या भेटीनंतर आपल्या निवासस्थानी या भेटीची सविस्तर माहिती पवारांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, बाळासाहेब विखेंच्या ‘दुष्काळ पवारांमुळेच पडला’, या टीकेला थेट उत्तर न देता, पवार म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी राज्याचा मुख्यमंत्री नाही, ही बाब सर्वांनाच ठाऊ क आहे, तरीही काही लोक मलाच सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवतात. बहुदा वयामुळे त्यांना असे प्रश्न पडत असावेत.