शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

‘दुष्काळप्रश्नी सरकारला घेरणार’

By admin | Published: March 21, 2016 3:33 AM

विदर्भातील तब्बल ४ हजार खेड्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यास चालढकल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढल्यानंतर

मुंबई : विदर्भातील तब्बल ४ हजार खेड्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यास चालढकल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढल्यानंतर आता विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. विदर्भातील दुष्काळी उपाययोजनांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असून, सोमवारी सभागृहात सरकारला याबाबत जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांच्या अहवालात विदर्भातील ६ जिल्ह्यांतील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असतानाही राज्य सरकारने दुष्काळ का जाहीर केला नाही, या मुद्द्यावर काँग्रेसने विधिमंडळातही दाद मागितली होती. (प्रतिनिधी)दुष्काळाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अहवाल शासनाला प्राप्त झाले की नाही, याबाबत अनभिज्ञता दर्शवली होती. न्यायालयाने सरकारला नोटीसही बजावली होती. तरीही या अहवालाबाबत राज्य सरकारला माहिती नसल्याचे सांगण्यात आले. हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. सरकारला जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाबाबत माहितीच नव्हती, तर सरकारने याचिकेवर खंडपीठासमोर बाजू कशी मांडली, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.