शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘जात वैधते’चा अडसर अखेर दूर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 06:14 IST

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भातील कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास मंजुरी दिली आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेताना वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय, ही मुभा केवळ २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठीच असणार आहे.यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमातील आरक्षित जागेवर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. परंतु, जात प्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान वैधता प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००, यात सुधारणा करण्यासाठी राज्यपालांकडे विनंती केली होती. त्यानुसार राज्यपालांनी सुधारणेस मान्यता दिली आहे. या सुधारणेनुसार, या वर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडसर दूर झाला आहे.आता या विद्यार्थ्यांनाजात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचापुरावा सादर करून प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेतानावैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास राखीव प्रवर्गातून मिळवलेला तात्पुरता प्रवेश रद्द होणार आहे. ही तरतूद फक्त सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच लागू राहणार आहे.