शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळी गावाच्या संख्येत वाढ

By admin | Published: January 01, 2015 1:24 AM

केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या

नागपूर विभाग : २७०० गावांची वाढनागपूर : केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या २०२९ होती आता ही संख्या ४८३२ झाली आहे.नजरअंदाज पैसेवारीनुसार नागपूर विभागात एकूण २०२९ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा खाली होती. त्यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, भंडारा जिल्ह्यातील ७ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ गावांचा समावेश होता. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करू लागल्याने सरकारवर टीका होऊ लागली होती. राज्य सरकारने तत्काळ केंद्राकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात केंद्रीय पथकाने दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. नागपूर विभागातही या पथकाने पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती व त्याच वेळी राज्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत सरासरी ५७०० गावांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सरकारने सुधारित पैसेवारी काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यानुसार विभागातील दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी ही संख्या २०२९ होती व आता ती ४८३२ झाली आहे. दुष्काळी भागातील खरीपांच्या सर्वच गावांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे. सुधारित अहवालानुसार नागपूर विभागात एकूण खरीप गावांची संख्या ७९४३ असून त्यापैकी ७७९६ गावांची पैसेवारी काढण्यात आली. त्यापैकी ४८३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी आहे, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)नागपूर जिल्ह्यात १२०० गावांची वाढनागपूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत तब्बल १२०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार जिल्ह्यात दुष्काळी गावांची संख्या ५९५ होती. आता सुधारित पैसेवारीनुसार ही संख्या १७९५ वर गेली आहे. सरासरी सर्वच खरीप गावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.